आम्ही एक स्थिर सरकार देऊ अजित पवार : नरेंद्र मोदी यांचे आभार
लढवय्या रोखठोक :
महाराष्ट्र राज्याला भारतीय जनता पार्टीचे पुन्हा एकदा सरकार मिळाले आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची वर्णी लागली आहे. तसाच शपथविधी नुकताच पार पडला या सर्व घडामोडींवर उलट-सुलट चर्चा होत असताना मात्र अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून आम्ही या राज्याला एक स्थिर सरकार देऊ व राज्याच्या हितासाठी मेहनत घेऊ असा विश्वास त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या निर्णयाबाबत कोणतीही शंका उपस्थित होत नाही हे स्पष्ट होत आहे .