अंत्यविधीला येताय लाकडे घेऊन या ! - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

अंत्यविधीला येताय लाकडे घेऊन या !

अंत्यविधीला येताय लाकडे घेऊन या !
 मरणानंतर ही मरणयातना
लढवय्या रोखठोक / कळंबोली

    कळंबोली शहरात असलेल्या स्मशानात सध्या प्रेत जाळण्यासाठी लाकडे उपलब्ध नाहीत त्यामुळे अंत्यविधीला येणारे नातेवाईकच लाकडे सोबत घेऊन येत असल्याचा प्रकार सध्या पहावयास मिळत आहे .
 त्यांच्यावर ही वेळ महापालिकेच्या ढिम्म पणा मुळे ओढवली आहे.
    मरणानंतर मृतास   लागणारी चार लाकडं  सध्या पनवेल महानगर पालिकेकडून पुरविण्यासाठी विलंब होत असून नागरिकांनी  तीव्र संताप व्यक्त केला आहे .
  पनवेल महानगर पालिकेत सिडकोकडे असलेले आरोग्य सेवा हस्तांतरण झाली मात्र नियोजनाच्या अभावा मुळे अद्याप महापालिका हस्तांतरण झालेल्या सेवा पुरवण्यात मागे राहत आहेत .
  पनवेल महानगर पालिकेला स्मार्ट सिटीचे पडत असलेले स्वप्न व ते पूर्ण करण्यासाठी त्यांची चालली धावाधाव पाहता स्मशानाच्या मरणयातना त्यांना दिसेनाश्या झाल्या आहेत .
   कळंबोली स्मशानभूमी या ठिकाणी लाकडे पुरवणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने काम थांबविण्यास सांगितल्यानंतर   याठिकाणी आता लाकडे महानगरपालिका पुरवणार आहे .
 मात्र कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याने याकडे काना डोळा केला जात आहे .
  हा लाकडांचा पुरवठा होईल तेव्हा होईल मात्र सध्यातरी स्मशानात अंत्यविधी साठी येताना 
  सोबत लाकडे देखील आणा कारण पालिका नियोजन  करत आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0