महावितरणाच्या वीजबिलात सावळा गोंधळ
वीज बिलांवरील मीटर फोटो गायब
लढवय्या रोखठोक / कळंबोली
महावितरणाच्या माध्यमातून कळंबोलीसह आसपासच्या शहरांना काढण्यात येणाऱ्या वीज बिलांचा सावळा गोंधळ सुरूच असून याठिकाणी असलेले महावीतरणाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यातल्या जिव्हाळयाच्या हित संबंधामुळे वीज ग्राहकांना दर महिन्याला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .
वीज ग्राहकांना येणाऱ्या विद्युत बिलावर अवश्यक असणारे वीज मिटरचे फोटो पुन्हा गायब झाले असून सरासरी बिल ग्राहकांच्या माथी मारण्यात आलेली आहेत .
ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मागे घेतलेल्या जनता दरबारात अधिकाऱ्यांना व वीज रिडींग घेणाऱ्या ठेकेदारांच्या बेशिस्त कारभारावर बोट ठेवत त्यांना ताकीत देऊन देखील सुधारणा होत नसल्याने शहरातील नागरिक
हैराण झाले आहे .
दर महिन्याला येणारे वीज बिल हे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचवत असून बिलात पारदर्शकता न दाखवता लूट केली जात आहे .
उन्हाळ्यात उन्हाळा आहे असं सांगून विज अधिक वापरली असे सांगून ग्राहकांच्या खिशातून पैसे महावितरण उकळत असून आता थंडीत विजेचा वापर कमी करून सुद्धा त्यांची लूट सुरू आहे .
ऊर्जामंत्र्यांनी या प्रकारावर गंभीर दखल घेणे गरजेचे असून कळंबोलीत सामाजिक संस्था याबाबत ऊर्जामंत्री यांना निवेदन सादर करणार आहेत .
वीज बिलांवरील मीटर फोटो गायब
लढवय्या रोखठोक / कळंबोली
महावितरणाच्या माध्यमातून कळंबोलीसह आसपासच्या शहरांना काढण्यात येणाऱ्या वीज बिलांचा सावळा गोंधळ सुरूच असून याठिकाणी असलेले महावीतरणाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यातल्या जिव्हाळयाच्या हित संबंधामुळे वीज ग्राहकांना दर महिन्याला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .
वीज ग्राहकांना येणाऱ्या विद्युत बिलावर अवश्यक असणारे वीज मिटरचे फोटो पुन्हा गायब झाले असून सरासरी बिल ग्राहकांच्या माथी मारण्यात आलेली आहेत .
ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मागे घेतलेल्या जनता दरबारात अधिकाऱ्यांना व वीज रिडींग घेणाऱ्या ठेकेदारांच्या बेशिस्त कारभारावर बोट ठेवत त्यांना ताकीत देऊन देखील सुधारणा होत नसल्याने शहरातील नागरिक
हैराण झाले आहे .
दर महिन्याला येणारे वीज बिल हे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचवत असून बिलात पारदर्शकता न दाखवता लूट केली जात आहे .
उन्हाळ्यात उन्हाळा आहे असं सांगून विज अधिक वापरली असे सांगून ग्राहकांच्या खिशातून पैसे महावितरण उकळत असून आता थंडीत विजेचा वापर कमी करून सुद्धा त्यांची लूट सुरू आहे .
ऊर्जामंत्र्यांनी या प्रकारावर गंभीर दखल घेणे गरजेचे असून कळंबोलीत सामाजिक संस्था याबाबत ऊर्जामंत्री यांना निवेदन सादर करणार आहेत .